प्राचीन काळापासून ते अर्वाचिन काळापर्यंत
करमाळा घेऊन, वाट पाहतेय…कन्याकुमारी
“स्वयंवरा” साठी, तीन समुद्रांच्या संगमाकाठी,
वाट पाहातेय, वाट संपण्यासाठी (1)
तमा नाही तिला लोक लज्जेची
तमा नाही तिला ऊन पावसाची,
तमा नाही तिला यौवन उलटण्याची
तिलांजली दिलीय तिनं, आपल्या आयुष्याची (2)
या सोशिक प्रतीक्षेत तिला
ना कोणाची साथ ना साक्ष ,
गाज आहे फक्त , गरजणाऱ्या दर्याची
अनं अवकाशात फिरणाऱ्या चंद्र, सूर्य, ताऱ्यांची (3)
आदिमाय पार्वतीला, लाभले जसे शिव-प्रभू समंत
तसाच कोणी हिमालय-भारत-पुत्र, शोभिवंत
येईल जर दक्षिणेला तर…तर वरदक्षिणा म्हणून
देईल समुद्र सर्वच आसमंत(4)
अभिशाप पण असतो, अश्राप कुमारिकांच्या स्वयंवराना ,
प्रेमाची झाली याचना , तर प्रणयिणीची होते विवंचना,
वैफल्यात फसलेल्या, संसारात होरपळलेल्या,हळव्या कुमारिकांचे निश्वास;
कन्याकुमारीच्या तपास, देती आश्वास (5)
तपस्या घडते जेव्हा,स्थळ-काळ-वेळ हरपून,
कोणत्या फळाची, अपेक्षा निरसून
तेव्हा “वर” मिळतो कन्याकुमारीला , घे निरखून
पंच-प्राण, द्रौपदीचे ,”वर” म्हणोन पारखून (6)
पंचकन्या; अहिल्या, द्रौपदी,कुंती, तारा ,मंदोदरी
अन सीता; पतिताच ठरविल्या , भाळी आत्मक्लेश उत्तरोत्तरी….
साऱ्या जरी पतिव्रता नारी…..
इंगित याचे समजून ,”अर्ध-नंरनारी”……जाली कन्याकुमारी (7)
कलियुगातील मुग्धकुमारींना, दे वरमंत्र श्रेष्ठ
प्रेमाशी आणि फक्त प्रेमाशीच ,राहा एकनिष्ठ,
अंतस्थ प्रेमापुढे, सारेच कनिष्ठ
“नश्वर-वर” नव्हे परमेश्वर, अंतरीचे प्रेम झरूदे नित्य,
वरमंत्र पावून कन्याकुमारी, झाली कृतकृत्य (8)
——————————————————————————————————————–
Pankaj Pandit can be contacted email : panditpank@gmail.com
——————————————————————————————————————–